सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीचे १३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहेत. त्यानंतर सर्व लाभार्थी १४ व्या हप्त्या ची प्रतीक्षा करीत आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हा हप्ता मे किंवा जून महिन्यात जारी केला जाऊ शकतो. त्यासाठी सरकारनेही पूर्ण तयारी केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा २००० रुपयांचे तीन हप्ते मिळतात. एकूणच सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वार्षिक ६००० रुपये थेट जमा करते.
