सिंधुदुर्ग : काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस लागला. दोडामार्ग तालुक्यात तर जोरदार अतिवृष्टी झाली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस बरसला आहे. त्यामुळे उन्हाळी शेतीचे फार मोठे नुकसान होणार आहे. तर आंबा पिकावर आणि काजू पिकावरही त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. यावर्षी आंबा आणी काजू पिकाचा मोहोर चांगला असून या पावसामुळे आंबा मोहोर झाडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जत्रोत्सव चालू असून या अवकाळी पावसाचा फटका जत्रोत्सवाला सुद्धा बसताना पाहायला मिळत आहे.


